Sunday, 27 December 2009

वचन




लाटेच एकच उद्दिष्ट असत, 
कसही करून किनाऱ्याला गाठाव......!!!

किनाऱ्याला नसेल का वाटत,
कधी लाटेकडे धावाव.......?

कदाचित वाटत असुनही, त्याला ते शक्य नसाव 
आधार द्यायच वचन त्याच जमिनीशी पक्क असाव.....!!!

                              ----डॉ.कल्पेश पाटील.



Thursday, 24 December 2009

एक प्रवास!!!

 

एक प्रवास मैत्रीचा 
जश्या हळूवार पावसाच्या सरींचा...!
ती पावसाची सर अलगद येउन जावी 
अन सुंदरशी एक संध्याकाळ हळूच खुलून यावी...!!


एक प्रवास सहवासाचा
जणू अलगद पडणाऱ्या गारांचा...!
न बोलताही बरच काही सांगणारा 
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा...!! 



एक प्रवास शुन्याचा 
जणू हिमालायाशी भिडण्याचा...!
शुन्यातून नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीचा चाहुल देणारा...!!


एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्षणाला माणूस घडवण्याचा...!
हसता हसता रडवणारा 
अन रडवुन हळूच हसवणारा...!!


एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणाऱ्या दोन जिवांचा...!
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायचा...!!


एक प्रवास प्रयत्नांचा 
सुख दुखातील नाजुक क्षणांचा...!
अखंड घडवणाऱ्या माणुसकीचा
अन नवी उमेद देणाऱ्या घडींचा...!!


एक प्रवास 
तुमच्या आमच्या आवडीचा...!
साठवू म्हटले तर साठवणीचा
आठवू म्हटले तर आठवणीचा ...!!



इथे हळूच येउन विसावलाय .....एक प्रवास!!!



                                   ---- डॉ.कल्पेश पाटील.






Monday, 14 December 2009

आठवण

                                                                    
माझी आठवण कधीतरी येईलच तुला,
तू कदाचित रडशिलही, 
हात तुझे जुळवून ठेव तू,
सगळी आसव तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बाघ त्याच्याकडे,
एकटाच राहिलेला तो थेंब मीच असेल...


माझ्या आठवणी एखाद्याला सांगताना,
तू कदाचित हसशिलही,
जो थांबेल तुझ्या ओठांवर,
नीट वापर त्याला,
अड़खडळलेला तो शब्द मीच असेल...


कधी सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे तू मिटून घेशील,
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळूक,
नीट बघ जाणवून, ती झुळूकही मीच असेल...!!!                                                                              
                                   
                                  ---डॉ. कल्पेश पाटील.





Sunday, 13 December 2009

नात मैत्रीच प्रेमात बदलत




















नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा कुणी आयुष्य बनत.


नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा तीच स्वप्नातही येण होत.

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा घोळक्यात लक्ष्य फक्त तिच्याकडे असत.


नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा मन तिच्या विचारात रमत.



नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा मैत्रीपेक्ष्या अधिक काहीतरी हव असत.

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा रोजच्या गप्पांच रूप बदलत 


नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस,जेव्हा येताच ती समोर लाजायला होत 


नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस ,जेव्हा वाचताच ही कविता कुणीतरी आठवत...!
                              ----   डॉ. कल्पेश पाटील.









Saturday, 5 December 2009

डोळे कश्यासाठी..??





डोळे कश्यासाठी...??
बालपणी शेजारील बंटीची  खेळणी बघण्यासाठी,
मला पण तेच पाहिजे  अस सांगत बाबांपुधे रडण्यासाठी,
मामाच्या गावाला  जाताना पळती  झाडे  पाहण्यासाठी,
बालपणाचा एक एक क्षण मनापासून जगण्यासाठी.


डोळे कश्यासाठी..??
इवल्याश्या पापणित एक मोठे स्वप्न पाहण्यासाठी,
आणि ते पूर्ण होइल याची आतुरतेने वाट पाहण्यासाठी,
काहीतरी विशेष कराव अस एकच वेड लागण्यासाठी,
आणि एका वेडाखातर अनेक राती जागण्यासाठी.


डोळे कश्यासाठी..??
निखळ यौवानातील   पहिल-वहिल प्रेम करण्यासाठी
एका छानश्या  चेहर्यावर मनापासून  मरण्यासाठी
मनोमनी हलूवार पणे एकच मूक होकार देण्यासाठी.
या होकाराची एक छबी  आपल्या काळजात घेण्यासाठी


डोळे कश्यासाठी..??
जीवनाची ही शिडी सतत न थांबता चढण्यासाठी,
सुख देण्यासाठी आणि दुखात रडण्यासाठी,
सुखी-सफल जीवनाचे पांग कायमचे फिटण्यासाठी
आणि सर्वात शेवटी,फक्त एकदा शांतपणे मिटण्यासाठी....!!

                                  --डॉ.कल्पेश पाटील.