पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती.
सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले,
मनाच्या गाभाऱ्यात मात्र आवसेची रात होती.
समजुन फूले ज्यांना मी हवेत उधाळले,
उमगले मज नंतर काट्याची ती जात होती.
आयुश्याची लक्तरे अन जीवनाची झालेली दशा,
खडतर या वाटेवरती फ़क़्त दुःखाचीच साथ होती.
आयुश्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले,
मिणमीणणार्या या दिपामधली संपलेली वात होती.
--डॉ. कल्पेश पाटील.
--डॉ. कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment