कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी;
तडकलेच जर हृदय कधी,
तर जोडताना असह्य यातना व्हावी.
डायरीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे;
अचानक एक दिवस त्या नावाचे
डायारीत येणे बंद व्हावे.
स्वप्नात कुणाला असेही बघू नये
की अंधारातही त्याचे हात असावे;
तुटलेच जर स्वप्न कधी,
तर आपल्या हातात काहीच नसावे.
कुणालाही इतका वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा;
एक दिवस आरशात आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा.
कुणाचे इतकेही एकू नये,
की आपल्या कानात त्याच्याच शब्दांचा घूमजाव व्हावा;
आणि एक दिवस आपल्या तोंडातून,
त्याच शब्दांचा उच्चार व्हावा.
पण...
कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये,
की आपल्या सावलीशिवाय आपल्या सोबत काहीच नसावे;
दूरदूर आवाज दिला तरी,
आपले शब्द जागीच घुमावेत......
---डॉ.कल्पेश पाटील.
No comments:
Post a Comment