एकदा ती माझ्याकडे आली,
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतच ती,
देऊन हात घेउन गेली...
होतो सोबत आम्ही चालत,
कधी शांत कधी बोलत;
पायवाट निळसर नव्हती संपत,
नभी चांदणे चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत.
सुरेल आवाज जणू कोकीळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत,
मनवट सुर बासरीचे उमलत,
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची;
गालावर खळी नाजुक पडायची
नयन शिम्पल्यात जपावी वाटायची.
तरुतळी एका आम्ही बसलो,
मनीचे सारे तिला मी वदलो;
हात थरथरता तिच्या हातात,
परी नजर थेट तिच्या डोळ्यात.
काय झाल पुढे सांगत नाही,
स्वप्न पुन्हा सार आठवेच नाही;
झालो जागा तरी उठलो नाही,
करत विचार पडलो,
मी प्रेमामधे तर पडलो नाही...?
---डॉ.कल्पेश पाटील.
doctor,this poem i liked really too much..i think you have entered in wrong profession...he he :-)that girl with u will be really lucky ha....!!!...pratiksha
ReplyDeletedoctor,farach sundar ahe hi kavita.hi kavita jya vyaktisathi lihili ahe ti kharach tumchya prematach padel!khup bahvanapradan lekhan ahe tumcha!ajun chan kavita tumchyakadun aikayla avadtil!keep up ur good work!cheers!
ReplyDelete